मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने काही आमदार नाराज आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत. हा परिवाराचा विषय आहे. नाराजी असून, नसून चालत नाही. घरामध्ये प्रत्येकाच्या मनासारखे होत नसतं. पण, प्रामाणिक हे आहे की मंत्रिमंडळ विस्तार आता व्हायला पाहिजे, “असे मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे म्हणजे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले.
“शेवटच्या सहा महिन्यात मंत्री बनवतील. महामंडळ देतील, तर त्याला अर्थ काय राहणार? आपल्या मतदारसंघात तयारी करतील की, राज्य सरकारचं काम करतील. त्यामुळे आता हा वेळ आहे. दीड वर्षात काम करायला संधी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तार करणे अपेक्षित आहे. 26 जानेवारीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल,”असेही भोंडेकर म्हणाले.