महाराष्ट्रात सध्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. या संदर्भात काही अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र अपिलेट ट्रिब्युनल (मॅट)मध्ये गेले आहेत. त्यांनी त्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळवली आहे.
या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या बदलल्यांमध्ये कोणतीही अनियमितता नाही. या बदल्या नियमानुसारच झालेल्या आहेत. दोनशे बदल्यांपैकी फक्त चार ते पाच प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या या मुदतपूर्व झाल्या आहेत. या बदल्यांसंदर्भात राजकीय नेत्यांनी नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी विनंती केली होती. त्यामुळे त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच हे अधिकारी मॅटमध्ये गेले आहेत.
विश्वभारत News Website