Breaking News

गोसे खुर्दसह ६० धरणांत कमी पाणीसाठा : प्रतिक्षा पावसाची

Advertisements

जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस स्थिरावलेला असतो. यंदा वातावरणातील बदलामुळे पाऊस लांबला आहे. त्याचा परिणाम राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. राज्यातील ६० हून अधिक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठी धरणे असलेल्या उजनी, कोयना, गोसीखुर्द या धरणांतील पाणीसाठा अतिशय खालच्या पातळीवर पोहोचला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Advertisements

या धरणात पाणीसाठा कमी

Advertisements

खडकपूर्णा, बोरगाव अंजनापूर, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी, सिरसमार्ग, खिराडपुरी, लिंबाला, मदनसुरी, राजेगाव, सीना कोलेगाव, बिंडगिहल, कारसा पोहरेगाव, खुलगापूर, साई, धामणी, बावनथडी, शिरपूर, नंद, धाम डॅम, भावली, चणकापूर, दरणा, काडवा, कारंजवण,पुणेगाव, तिसगाव, वैतरणा, वाघड, वाकीडॅम, दुधगंगा, राधानगरी, तिल्लरी (धामणी), तुळसी, निरा- देवघर, डिंभे, चासकमाण, पिंपळगाव जोगे, वडज, माणिकडोह, घोड, पवना, भाटघर, पानशेत, वरसगाव, गुंजवणी, टेमघर, मुळशी टाटा, लोणावळा टाटा, वलवण टाटा, वारणा, धोम बलकडी, धोम, कोयना, कान्हेर, वीर, उजनी या धरणांचा पाणीसाठा ० ते २० टक्क्यांच्या घरात गेला आहे. सध्याचा राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून २३.०५ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच काळात २६.७२ टक्के पाणी होते. गतवर्षीच्या तुलतेन पाणीसाठा ३.६७ टक्क्यांनी कमी असल्यामुळे पाऊस आणखी लांबल्यास राज्यात पाणीटंचाईची समस्या अधिक भीषण होण्याची भीती आहे.

किती प्रकल्प?

जलसंपदा विभागाचे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे सहा प्रादेशिक विभाग आहेत. या विभागांत २९८९ मोठे, तर २५९० मध्यम प्रकल्प आहेत. याखेरीज कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बंधारे व लहान तलाव आहेत. गेल्या कित्येक वर्षांत मुख्य धरणांच्या क्षेत्रात पावसाळय़ात दमदार पाऊस होत असल्याने आणि जूनमध्ये पावसाला सुरुवात होत असल्याने धरणांमध्ये किमान पाणीसाठा शिल्लक राहतो. मात्र, यंदा बिपरजॉय चक्रीवादळ, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे वेळेवर तयार न होणे, समुद्रात वादळासारखी स्थिती अशा विविध कारणांमुळे केरळमध्ये मोसमी वारे पोहोचण्यास विलंब झाला व त्याची पुढील वाटचालही अडली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर के सिविल लाइंस और शंकर नगर में 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर लगाने की शुरुआत

नागपुर के सिविल लाइंस और शंकर नगर में 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर …

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *