उन्हाळा आहे की काय,असा प्रश्न सर्वांना पडत आहे. कारण, सर्वत्र असह्य उन्हाचे चटके बसत आहे.राज्याच्या बहुतेक भागाला ऑक्टोबर हिटच्या झळा बसत आहेत. पुढील दहा राज्याला ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, विदर्भातील तापमान सरासरी ३५ अंशांवर गेले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पारा सरासरी ३४ अंशांवर आणि मुंबईसह कोकणात तापमान सरासरी ३३ अंश सेल्सिअसवर आहे. पुढील दहा दिवस ऑक्टोबर हिटच्या झळा बसणार आहेत. तापमानात सरासरी एक-दोन अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होऊन थंडीची चाहूल लागेल.
विश्वभारत News Website