Breaking News

राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

Advertisements

राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
मुंबई,
पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागात वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये कुठे वादळी वारे तर कुठे पावसाची स्थिती राहणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
25 ते 28 एप्रिल या काळात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. 27 आणि 28 एप्रिल रोजी कोकण आणि गोव्यासह उर्वरित मध्य भारतात अवकाळी पाऊस पडू शकतो. सध्या दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील बहुतांशी राज्यांत अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यातंही पावसाचे वातावरण तयार झाले असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

चंद्रपूर जिल्ह्यात भूकंप : पण, प्रशासन म्हणते…!

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर …

खूप झाले उत्सव, महोत्सव : आता रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या!

उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *