मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी दोन दिवसांपूर्वीचं पक्षाचा राजीनामा दिला. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या उपऱ्या नेत्यांचा नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे,असा आरोप गावडेंनी पक्षांतर करताना केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ते प्रवेश करणार आहेत.
काय कारण?
जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या उपऱ्या नेत्यांचा नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप वाढला आहे. गटबाजीला उधाण आलं आहे, हे सर्व मी कित्येक दिवसांपासून सहन करत होतो आणि याबद्दल मी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली, परंतु दखल घेतली जात नाही, असे गावडे म्हणाले.