Breaking News

गणपती विसर्जन,तिघांचा मृत्यू

Advertisements

वर्धा : गणेश विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज वर्धेलगतच्या मांडवा गावात घडली. कार्तिक तुळशीराम बलवीर (९), अथर्व सचिन वंजारी (१४) व संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (३५), अशी मृतांची नावे आहेत.

Advertisements

धुमधडाक्यात मिरवणुका निघाल्या. गावोगावी हीच स्थिती आहे. मांडवा गावातून काही जण विसर्जनासाठी निघाले. कालवा खोलीकरणासाठी झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरले. अल्पवयीन मुलांनी विसर्जन केले. त्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. त्यांना वाचविण्यासाठी तरुण संदीपने पाण्यात उडी घेतली. तिघेही बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या लहान मुलानी गावात धूम ठोकली. गावकरी घटनास्थळी पोहचले. मात्र, तोपर्यंत तिघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला होता. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे. घटनेने मांडवा पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

जात-पात,धर्म,संप्रदाय और क्षेत्रीयवाद बनाम भारतीय राजनीति

इसे दुर्भाग्य ही कहा जाएगा कि जहां राजनीति का आधार शिक्षा, वैज्ञानिक सोच, बराबरी का …

मनुष्य के किए हुए शुभ या अशुभ कर्मो का फल अवश्य भोगना पड़ता है! : गोस्वामी जी के विचार

मनुष्य के रूप में अच्छे कर्म के अभ्यास के द्वारा हमारे पास हमारी आध्यात्मिक प्रगति …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *