Breaking News

राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना असेल.

Advertisements

या योजनेअंतर्गंत प्रत्येक वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. येत्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार अनुदान जमा करण्यात येणार आहे. टप्प्या टप्प्याने ही रक्कम खात्यावर जमा होईल.

या योजनेसाठी अर्थसंकल्पात किती रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. तसेच या योजनेसाठी पात्र शेतकरी ठरविण्यासाठी कोणते निकष असतील,याबाबतही स्पष्टता नाही.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

किसानों को राहत : चना, मसूर एवं राई सरसों के उपार्जन का कार्य प्रारंभ : गेहूं उपार्जन के 35 केंद्र निर्धारित 

चना, मसूर एवं राई सरसों के उपार्जन का कार्य प्रारंभ : गेहूं उपार्जन के 35 …

विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक : नागपूर किती?

दिवसेंदिवस तापमान वाढत आहे.विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक नोंदवले गेले. आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *