Breaking News

७ वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू, पंढरपूरला जाताना भरधाव कारने उडवले

Advertisements

नागपूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरच्या वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ पंढरपूरला जाणा-या या दिंडीमध्ये भरधाव वेगाने कार घुसल्याने सात वारकरी जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले वारकरी हे जठारवाडी (जि. कोल्हापूर) या गावातील असल्याचे कळते.पोलीस दाखल झाले असून सर्वं मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आले आहेत.

Advertisements

कोल्हापूर जठारवाडी येथील दिंडी पंढरपूरकडे जात होती. दरम्यान जुणोनी येथे (MH 13 DE 7938) या क्रमांकाची चारचाकी ही दिंडीत घुसल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये ७ वारकऱ्यांचा यांचा मृत्यू झाला आहे. ६ जणांना उपचारासाठी पंढरपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *