Breaking News

काँग्रेसचे २२ आमदार भाजपच्या संपर्कात… वाचा

Advertisements

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर आता २९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडण्याची रणनिती आखली आहे, असा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते औरंगाबाद येथे शिवसेनेच्या बैठकीत बोलत होते. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Advertisements

शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाल्यानंतर राज्यातील सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. खैरे यांच्या या विधानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आहे. पटोले म्हणाले की, ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

आरक्षण नहीं हटेगा!अमित शाह ने देश के सामने रखे दो ऑप्शन

आरक्षण नहीं हटेगा! केंद्रीय मंत्री अमित शाह ने देश के सामने रखे दो ऑप्शन   …

नागपुरात भाजप आमदाराच्या बहिणीचे नाव मतदार यादीतून वगळले

मागील आठवड्यात नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान शांततेत पार पडले. मात्र मतदार यादीतील घोळ सध्या चर्चेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *