पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात विदर्भामध्ये २५ ते २७ मार्चदरम्यान हलक्या ते मध्यम पावसासह गारपीट होऊ शकते. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे.
कोणत्या जिल्ह्यात पाऊस?
रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबईमध्ये दोन दिवस तर २६ मार्चपर्यंत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी, बीड या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा गारपीट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे.