राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर नागपुरात सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले फडणवीस?
‘राहुल गांधी जेव्हा म्हणतात मी सावरकर नाही. तेव्हा मला वाटतं राहुल गांधींची ती औकाद नाही, मी औकड शब्द वापरला तर लोक वेगळा अर्थ काढतात, पण नागपुरात त्याला क्षमता म्हणतात.सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. त्यामुळे राहुल गांधींना सावरकर समजणार नाही’.
‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.