मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहणार आहेत. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच कुठे येतो? या कपोल्कल्पित मुख्यमंत्री बदलण्याबद्दल आणि राज्यात संभ्रम निर्माण करण्याबद्दल जे वातावरण तयार करत आहेत, ते केवळ राज्यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“काही अस्वस्थता निर्माण होणार नाही. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ मुख्यमंत्री असतील तर अस्वस्थता निर्माण होण्याचा काही प्रश्नच येत नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
“अजित पवार यांनी भरपूर खुलासे केले आहेत. त्या खुलाशांचा विचार केला तर अजित पवार का बाहेर आले, आणि भाजपसोबत का आले? हेही तुम्हाला कळलं आहे”, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. तसेच “पक्ष सोडून जे लोकं आले आहेत हे त्यांच्याच वरिष्ठ नेत्यांकडून होत असलेल्या त्रासामुळे सोडून आले आहेत. आमच्यामुळे ते पक्ष सोडून आलेले नाहीत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.