महाराष्ट्र भाजपची बैठक दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी झाली. त्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली. त्यात आठ नावे निश्चित करण्यात आली. त्यामध्ये नारायण राणे, विनोद तावडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, संजय उपाध्याय यांचा समावेश आहे. या आठपैकी तीन जणांची नावे निश्चित होणार आहे. विनोद तावडे यांनी बिहारमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. यामुळे त्यांना राज्यसभेचे बक्षीस दिले जाणार असल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी भाजप श्रेष्ठी करत असल्याची चर्चा आहे.
