Breaking News

माधुरी दीक्षितमुळे अभिनेत्याचा संसार उद्ध्वस्त? बायकोचं निधन…!

बॉलिवूडमध्ये काम करत असताना रिचा हिने अभिनेता संजय दत्त याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर रिचा हिने बॉलिवूडचा निरोप घेतला आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. फार कमी वयाच रिचा हिने अनेक संकटांना तोंड दिलं आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंच रिचा हिने संटकांचा सामना केला. फार कमी लोकांना रिचा शर्मा हिच्याबद्दल माहिती आहे.

लग्नाआधी संजय दत्त याने घातलेली अट

बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना रिचा शर्मा आणि संजय दत्त यांची पहिली ओळख झाली. पहिला भेटीतच रिचा आणि संजय एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रिचा आणि संजय यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण संजयने एकाच अटीवर लग्न करेल असं रिचाला सांगितलं. लग्नानंतर सिनेमात काम करायचं नाही… असं अभिनेत्याची अट होती. अभिनेत्याची अट रिचाने मान्य देखील केली.

संजय दत्त – माधुरी यांचं अफेअर

याच दरम्यान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. जेव्हा दोघांच्या रिलेशनशिपबद्दल रिचाला कळंल तेव्हा तिला मोठा धक्का बसला. आजारी असताना देखील रिचा संसार टिकवण्यासाठी मुंबईत आली. पण संजय आणि रिचा यांच्यामधील अडचणी वाढत होत्या. अखेर नातं घटस्फोटापर्यंत आलं. रिचा हिची प्रकृती चिंताजनक होऊ लागली आणि ती पून्हा न्यूयॉर्क याठिकाणी गेली.

पत्नी न्यूयॉर्क येथे गेल्यानंतर संजय दत्तच्या अडचणीत वाढ होऊ लागली. बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला तुरुंगवास भोगावा लागला. अखेर 10 डिसेंबर 1996 रोजी रिचा शर्मा हिचं निधन झालं. रिचा गेल्यानंतर तिच्या मुलीचे संगोपन अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी केलं. तर संजूबाबा आता तिसऱ्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

About विश्व भारत

Check Also

भिलाई में पढ़ी विशाखा राय ने जीता मिस इंडिया 2024 का खिताब

भिलाई में पढ़ी विशाखा राय ने जीता मिस इंडिया 2024 का खिताब टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *