Breaking News

तब्बल ५२ वर्षानंतर मंत्री पोहचले स्वतः च्या गावात

Advertisements

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्धा शहरात भरगच्च कार्यक्रम होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व आरटीओ कार्यालय वास्तूचे लोकार्पण, भाजप कार्यालय भूमीपूजन, सावरकर स्मारक अभिवादन, कबड्डी स्पर्धा समारोप प्रसंगी ते उपस्थित राहले. सोबत मंत्रिमंडळातील सहकारी अशोक उईके, प्रताप सरनाईक, डॉ. पंकज भोयर, इंद्रनील नाईक व चारही आमदार यांची उपस्थिती. पण एका मंत्र्याच्या वक्तव्याने लोकं अचंबित झाले. कारण ते सर्वांना चकित करणारे होते.

Advertisements

आरटीओ कार्यालय ई – लोकार्पण प्रसंगी बोलतांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की मी तब्बल ५२ वर्षानंतर माझ्या जन्मभूमीत येत आहे. माझ्या जन्मगावात येणे झाले नाही. पण आमदार असतांना व आता लोकप्रिय पालकमंत्री असलेले डॉ. भोयर हे मात्र माझ्या जन्मगावाची काळजी घेत असतात. भेट देत अडचणी सोडवितात. त्यांचे आभार, असे सरनाईक म्हणाले. मात्र त्यांनी भाषणात गावाचा उल्लेख कां टाळला, याची उत्सुकतावजा चर्चा झाली. कारण मंत्री सरनाईक आज प्रथमच बोलले की त्यांची जन्मभूमी वर्धा. वर्धेलगत गणेशपूर हे त्यांचे गाव असल्याची माहिती पूढे आली. गाव सोडून मुंबई गाठली आणि सरनाईक यांनी अशक्य ते साध्य केल्याचे लोकं सांगतात.

Advertisements

आज हा संदर्भ देत परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक भाषणात म्हणाले की आमच्या एसटी डेपोला आता डेपो नं म्हणता बस पोर्ट म्हणता येईल. गाडीत बसून येतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की दर्जेदार काम म्हणून बसपोर्ट असा उल्लेख पुढे झाला पाहिजे. तेच पुढे होणार. राज्यातील सर्व डेपो बसपोर्ट होतील, अशी काळजी घेऊ. आमच्या एस टीचे १५ हजार कोटीचे बजेट आता वाढवून १७ हजार कोटी रुपयाचे झाले आहे. सुसज्ज बसेस सर्व ठिकाणी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचा चिमटा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जन्मभूमीचा दाखला जाहीरपणे दिला आणि त्याची गमतीदार दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून घेतली. जिल्ह्यातील आमदारांनी ५० नव्या बसेस देण्याची मागणी केली होती. तो संदर्भ ठेवत मुख्यमंत्री म्हणाले की परिवहन मंत्री जन्मभूमीत आले त्याचा त्यांना आनंद झाला. जन्मभूमी ही सर्वश्रेष्ठ. म्हणून मागणी करतांना कंजुषी करण्याचे कारण नाही. तुम्ही लोकांनी ५० ऐवजी १०० नव्या कोऱ्या करकरीत बसेसची मागणी केली असती तर ती देखील मान्य झाली असती, असे बोलून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की बघा, पुन्हा मागणी करता येईल, अशी टिपणी दाद घेऊन गेली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *