Breaking News

हिंगणघाट तालुक्यातील संपूर्ण पिक नष्ट झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपये हेक्टरी मदत करा – आमदार समीर कुणावार

जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना मागणी
हिंगणघाट : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-  गेल्या काही दिवसांपासून हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक संपूर्ण नष्ट झाले असून त्यामुळे  शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे पेरणीच्या सुरूवातीला सुध्दा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे.पेरलेले बियाणे उगवले नव्हते तसेच अनेक शेतकऱ्यांना दुब्बार पेरणी सुध्दा करावी लागली होती आणि आता त्यांच्या हातात आलेले पिक संपूर्ण नष्ट झाले असून या सर्व शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.

About Vishwbharat

Check Also

रुग्णालयात आग : नर्सची हायकोर्टात याचिका

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी …

नागपूरजवळील वाघासाठी अभिनेत्री रविना टंडनचा ‘कॉल’

जंगलात शिकारीसाठी बाहेर पडलेल्या वाघाची चाहूल लागताच माकड किंवा हरीण यासारखे प्राणी मोठ-मोठ्याने आवाज करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *