कोविड-19 काळात मर्यादित करण्यात आलेली रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत करावी
खासदार रामदास तडस यांची लोकसभेत मागणी
वर्धा/नई दिल्ली: वैश्विक कोविड-19 महामारी नंतर अनेक विशेष रेलसेवा सुरु करण्यात आल्या परंतु विशेष रेल सेवा अंतर्गत वर्धा लोकसभा क्षेत्रातील महत्वपुर्ण स्टेशनवर थांबे देण्यात आलेले नसल्यामुळे अनेक प्रवाशी वर्गाना अडचणीचा सामना करावा लागत आहे, रेल सेवा पुर्ववत कराव्या यासाठी प्रवासी संघ, तसेच अनेक नागरीकांनी खासदार रामदास तडस यांच्या कडे विनंती केली स्थानिक अनेक वर्तमानपत्रामध्ये सुध्दा अनेक नागरिकांनी आपली समस्या मांडली, याची दखल घेऊन आज वर्धा लोकसभा मतदार क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम 377 अंतर्गत रेल सेवा पूर्ववत करण्याबाबत प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.
खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम 377 अंतर्गत मागणी करतांना म्हणाले की, कोविड-19 महामारी मुळे रेल विभाग सर्व रेल सेवा बंद करण्यात आली होती, कोविड-19 महामारीचे प्रमाण कमी झाल्यानंतर रेल विभाग विशेष रेल सेवा सुरु करण्यात आली परंतु अनेक रेल गाडयांचे थांबे कमी करण्यात आल्यामुळे संपुर्ण भारतातील प्रवासी व सर्वसाधारण नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्याचे निराकरण करण्याकरिता, सामान्य नागरीक, प्रवासी, व्यवसायी व विद्यार्थी यांचा विचार करुन पॅसेंजर रेल्वे गाड्या व एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे नियमित करण्यासाठी रेल्वेमंत्री यांना लोकसभेत विनंती केली.