Breaking News

गत 24 तासात 1462 कोरोनामुक्त, 1393 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

Advertisements

गत 24 तासात 1462 कोरोनामुक्त,

Advertisements

1393 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

Advertisements

Ø  आतापर्यंत 48,679 जणांची कोरोनावर मात

Ø   ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,731

 चंद्रपूर, दि. 5 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1462 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1393 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 66 हजार 431 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 48 हजार 679 झाली आहे. सध्या 16 हजार 731 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 96 हजार 966 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 25 हजार 332 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील हनुमान नगर तुकुम परिसरातील 70 वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील 40 वर्षीय पुरुष, रामनगर परिसरातील 66 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 46, 58  व 62वर्षीय पुरुष, 55 व 72 वर्षीय महिला, मारेगाव येथील 45 वर्षीय महिला, घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 40 वर्षीय महिला, वरोरा तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील 84 वर्षीय पुरुष, व्याहाड येथील 74 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 53 व 81  वर्षीय पुरुष,  नागभीड तालुक्यातील खैरी येथील 55 वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील 42 व 56 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, वणी- यवतमाळ येथील 12 वर्षीय मुलीचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1021 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 944, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 30, यवतमाळ 31, भंडारा 10 , गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1393 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 415, चंद्रपूर तालुका 69, बल्लारपूर 134, भद्रावती 106, ब्रम्हपुरी 60, नागभिड 41, सिंदेवाही 56 , मूल 91, सावली 41, पोंभूर्णा 07, गोंडपिपरी 34, राजूरा 25, चिमूर 62, वरोरा 168, कोरपना 61,  जिवती 13 व इतर ठिकाणच्या 10 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *