Breaking News

गत 24 तासात 2151 कोरोनामुक्त, 1180 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू

Advertisements

गत 24 तासात 2151 कोरोनामुक्त,

Advertisements

1180 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू

Advertisements

Ø आतापर्यंत 56,599 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 14,027

चंद्रपूर, दि. 9 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2151 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1180 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 71 हजार 728 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 56 हजार 599 झाली आहे. सध्या 14 हजार 27 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 12 हजार 583 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 36 हजार 639 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 55 वर्षीय पुरुष, महाकाली वार्ड येथील 42 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, नेहरू नगर वार्ड परिसरातील 70 वर्षीय पुरुष, संजय नगर येथील 60 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, जीवन ज्योती कॉलनी रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 81 वर्षीय पुरुष, चिखल परसोडी येथील 62 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील 62 वर्षीय पुरुष, करंजी येथील 60 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील काजळसर येथील 35 वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील 42 व 50 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1102 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1017 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 34, यवतमाळ 34, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1180 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 374, चंद्रपूर तालुका 58 , बल्लारपूर 114, भद्रावती 91, ब्रम्हपुरी 35, नागभिड 27, सिंदेवाही 12, मूल 125, सावली 35, पोंभूर्णा 04, गोंडपिपरी 49, राजूरा 50, चिमूर 25, वरोरा 105, कोरपना 53, जिवती 07 व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *