Breaking News

गत 24 तासात 2019 कोरोनामुक्त, 691 पॉझिटिव्ह तर 15 मृत्यू

गत 24 तासात 2019 कोरोनामुक्त,

691 पॉझिटिव्ह तर 15 मृत्यू

Ø आतापर्यंत 58,618 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 12,684

चंद्रपूर, दि. 10 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2019 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 691 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 15 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 72 हजार 419 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 58 हजार 618 झाली आहे. सध्या 12 हजार 684 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 14 हजार 259 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 38 हजार 58 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 55 वर्षीय पुरुष, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 55 वर्षीय पुरुष,  वरोरा तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 30 वर्षीय महिला. घोटनिबांळा 75 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 55 वर्षीय महिला, गडचांदूर येथील 58 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष. सावली तालुक्यातील 29 व 85 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील कच्चेपार येथील 50 वर्षीय पुरुष, नवेगाव पांडव येथील 39 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील 58 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर येथील 65 वर्षीय पुरुष तर वडसा गडचिरोली येथील 49 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1117 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1031 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 34, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 691 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 252, चंद्रपूर तालुका 47 , बल्लारपूर 65, भद्रावती 01, ब्रम्हपुरी 20, नागभिड 17, सिंदेवाही 59, मूल 10, सावली 35, पोंभूर्णा 04, गोंडपिपरी 52, राजूरा 02, चिमूर 33, वरोरा 11, कोरपना 61, जिवती 04 व इतर ठिकाणच्या 18रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *