Breaking News

गत 24 तासात 838 कोरोनामुक्त, 355 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू

Advertisements

गत 24 तासात 838 कोरोनामुक्त,355 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू

Advertisements

Ø  आतापर्यंत 73,836 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 5,751

Advertisements

चंद्रपूर, दि.23 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 838 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 355 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 12 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 955 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 73 हजार 836 झाली आहे. सध्या 5 हजार 751 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 55 हजार 488 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 72 हजार 12 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

 आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 59 वर्षीय महिला, वडगाव येथील 60 वर्षीय महिला, चिरोली येथील 86 वर्षीय महिला. बल्लारपूर तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, पळसगाव येथील 57 वर्षीय महिला. भद्रावती तालुक्यातील वायगाव येथील 62 वर्षीय पुरुष, शेगाव येथील 68 वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथील 50 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील परसोडी येथील 50 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील 50 वर्षीय महिला. आरमोरी गडचिरोली येथील 49 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1368 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1268, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 36, यवतमाळ 45, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 355 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 66, चंद्रपूर तालुका 20, बल्लारपूर 62, भद्रावती 36, ब्रम्हपुरी 05, नागभिड 15, सिंदेवाही 06, मूल 27, सावली 10, पोंभूर्णा 14, गोंडपिपरी 25, राजूरा 22, चिमूर 05, वरोरा 24, कोरपना 15, जिवती 01व इतर ठिकाणच्या 02 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *