विश्व भारत ऑनलाईन : पुढील ३ दिवस राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र काल पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात मुंबई, नागपूर, अमरावती,पुणे, अकोला, कोल्हापूर जिल्ह्यातील परिसरात पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने आज विदर्भात यलो अलर्ट दिला आहे. …
Read More »माहेरवाशीण गौराईंचे आगमन
अमरावती : ‘आली आली गौराई, सोन्यारूनप्याच्या पावलानं, आली आली गौराई, धनधान्याच्या पावलानं,’ शनिवारी सोनपावलांनी माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे.गौरींच्या स्वागतासाठी महिला मंडळी सज्ज झाल्याचे दिसतेय. मुहूर्त कोणता? गणपती मांगल्याचे, तर महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक आहे.तिच्या प्रतिष्ठापनेनंतर घराघरामध्ये मांगल्य, सुख, समृद्धी, आनंद टिकून राहतो, अशी भाविकांची भावना आहे. माहेरवाशीण असलेल्या गौराई अनेक ठिकाणी पिढ्यापिढ्या बसवल्या जातात, तर काही ठिकाणी हौस म्हणून, …
Read More »अमरावती शहरात आढळले बिबट्याचे बछडे
अमरावती : शहरातील महादेव खोरी नजीकच्या जंगलात गुरुवारी दुपारी बिबट्याचे दोन बछडे दिसले. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बछड्यांना वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यांना वडाळी येथील वन उद्यानात ठेवण्यात आले आहे. महादेव खोरी परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. जवळ असलेल्या पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग असल्याचे कळते. तर, बछडे दिसल्यानंतर लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट मादी पळून गेली. …
Read More »आज नागपूर, चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता
नागपूर : नागपूर, चंद्रपूरसह काही जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी आज बुधवारी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर,औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.आता पुन्हा पाऊस धो-धो बरसेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे …
Read More »आरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवअसेल!.
आरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवअसेल!. स ही वैऱ्याचा मागासवर्गीय समाजाला आरक्षण हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासु वैचारिक मांडणीमुळे मिळाले होते.त्यासाठी त्यानी जे कष्ट,त्याग आणि जिद्द दाखवली त्यांची मूल्यमापन कोणत्याही किंमतीने होऊ शकत नाही. त्यांनी संघटित होऊन शासन यंत्रणेवर कायमस्वरूपी दबाव निर्माण करून ठेवण्याचे आवाहन केले होते.तेच उद्धिष्ट आजचा आरक्षण लाभार्थी विसरून आरक्षणाला विरोधात भूमिका घेणाऱ्या संघटना युनियनचे …
Read More »दहावीचा निकाल ९९.९५ टक्के,एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत
८३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असलेला बोर्डाचा निकाल जाहीर झाल्याने अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण मंडळाने दहावीचा एकूण निकाल ९९.९५ टक्के …
Read More »आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड
आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आज आधार कार्डला खूप महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाकडे आधार कार्ड असतोच. अशातच काही वेळा आपले आधार कार्ड घरी राहिले, किंवा हरवले तर खूप अडचण निर्माण होते. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड काही …
Read More »शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण चंद्रपूर,दि. 2 जुलै : महाराष्ट्राने कृषीविषयक अनेक अभिनव संकल्पना देशाला दिल्या आहेत. कृषी क्षेत्राचा आणि शेतक-यांचा विकास हे राज्य सरकारचे प्राधान्याचे विषय आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याची चांगली संधी आम्हाला मिळाली आहे. शेतक-यांच्या समृध्दीसाठी हमीभाव आणि बाजार समित्यांची निर्मिती झाली असून राज्यात या दोन्ही बाबी …
Read More »गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, मंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा!
मंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा! गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सवावर करोनाचं विघ्न कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर ठाकरे सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले …
Read More »कोरोनाच्या सावटात शैक्षणिक शुल्क कपात – ‘गोंडवाना’चा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय
कोरोनाच्या सावटात शैक्षणिक शुल्क कपात – ‘गोंडवाना’चा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय चंद्रपूर, मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणुचे भयावह संकट आहे. या महामारीने विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात आले नाहीत. शिवाय त्यांचे कुटुंबही आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार्या विविध शैक्षणिक शुल्कात कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी घेतला. या निर्णयाने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक सत्र …
Read More »
विश्वभारत News Website