Breaking News

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकावर त्वरित कारवाई करा : देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Advertisements

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. अशा बँकांवर कारवाई करण्याचे आदेश देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

Advertisements

या बैठकीत बँका पीक कर्ज नाकारत असल्याने फडणवीस यांनी आधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना केल्या आहेत. जर बँका राज्य सरकारची धोरणं ऐकत नसतील तर त्यांना फटका दिल्याशिवाय जमणार नाही. एकतरी एफआयआर दाखल करावा जेणेकरून बँकाना समज मिळेल असेही फडणवीस यांनी सुनावले आहे.

Advertisements

जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे अशी माहीती फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यामुळे आता गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला गती प्राप्त होणार आहे. जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणार असे आश्वासन देखील त्यांनी दिले. शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्यासाठी सोलर योजना आणण्यात येत आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SP के निर्देश पर गौतस्करी के खिलाफ ज्ञापन सौपते ही पुलिस विभाग की बड़ी कार्यवाई 

पुलिस अधीक्षक के निर्देश पर गौतस्करी के खिलाफ ज्ञापन सौपते ही पुलिस विभाग की बड़ी …

रामटेकमध्ये सेनेचा पराभव होण्याची भीती? भाजपचा ‘प्लॅन’ काय आहे?

रामटेक लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होतोय, अशी शक्यता महायुतीच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवली आहे. पक्षाचा पराभव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *