Advertisements
एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार
वर्धा जिल्हा प्रतिनिधी:
एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी. यांच्या अंतर्गत गेल्या 3 वर्षांपासून आर्वी तालुक्यातील पांजरा, सुकळी, उमरी, भादोड, बोथली, या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , यामध्ये प्रकल्प गावातील युवकांना रोजगार कसा प्राप्त होईल हा सुद्धा विचार करीत असते, याच अनुषंगाने , मागील काही दिवसात बोथली येथील 7 युवकांना प्रकल्पामार्फत आरएसईटीआय वर्धा येथे पाठविण्यात आले , तेथे जाऊन युवकांनी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेतले , नन्तर काही दिवसात 7 पैकी 5 युवकांनी आपले उद्योग अर्जासबंधी अर्ज बँक ऑफ इंडिया रोहना येथे सादर केले , यांनतर 15 दिवसात 4 युवकांचे अर्ज बँकेने मान्य करून प्रत्येकी 20 हजार प्रमाणे कर्ज दिले , व युवकांनी आपल्याच गावात दुग्ध व्यवसाय सुरू केला, याकरिता समाज कार्यकर्ते श्री रवींद्र तांदुळकर व श्री मंगेश पांडे परिश्रम घेत आहे ,
कर्ज घेतलेल्या युवकांनी सदर रकमेची नियमितपणे परतफेड केल्यास 1 लाख पर्यंत कर्ज आम्ही देऊ,ज्यामुळे त्यांच्या व्यवसायात आणखी वृद्धी होईल,
प्रीती हिरडकर -बँक व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया रोहना
Advertisements