Breaking News

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार

Advertisements
एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार
वर्धा जिल्हा प्रतिनिधी:
एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी. यांच्या अंतर्गत  गेल्या 3 वर्षांपासून  आर्वी तालुक्यातील पांजरा, सुकळी, उमरी, भादोड, बोथली, या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , यामध्ये प्रकल्प गावातील युवकांना रोजगार कसा प्राप्त होईल हा सुद्धा विचार करीत असते, याच अनुषंगाने , मागील काही दिवसात बोथली येथील 7 युवकांना प्रकल्पामार्फत आरएसईटीआय वर्धा येथे पाठविण्यात आले , तेथे जाऊन युवकांनी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेतले , नन्तर काही दिवसात 7 पैकी 5 युवकांनी आपले उद्योग अर्जासबंधी अर्ज बँक ऑफ इंडिया रोहना येथे  सादर केले , यांनतर 15 दिवसात 4 युवकांचे अर्ज बँकेने मान्य करून प्रत्येकी 20 हजार प्रमाणे कर्ज दिले , व युवकांनी आपल्याच गावात दुग्ध व्यवसाय सुरू केला, याकरिता समाज कार्यकर्ते श्री रवींद्र तांदुळकर व श्री मंगेश पांडे परिश्रम घेत आहे ,
कर्ज घेतलेल्या युवकांनी सदर रकमेची नियमितपणे परतफेड केल्यास 1 लाख पर्यंत कर्ज आम्ही देऊ,ज्यामुळे त्यांच्या व्यवसायात आणखी वृद्धी होईल,
प्रीती हिरडकर -बँक व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया रोहना
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती रद्द होणार? दोषी उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

नागपूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर अलिकडेच घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप जिल्हा …

नागपुरात प्राध्यापक भरतीत घोटाळा?राजेंद्र गवई काय म्हणाले…!

नागपुरातील प्रसिद्ध डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी हे प्राध्यापक भरतीवरून चांगलेच चर्चेत आले आहे. प्राध्यापक भरतीवरून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *