Breaking News

‘लम्पी’चे थैमान,75 हजार गायी दगावल्या

मोहन कारेमोरे

नागपूर : लम्पी या रोगाचा देशात १५ राज्यांमधील १७५ जिल्ह्यांत प्रादुर्भाव झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक गायी तसेच जनावरांना याची लागण झाली असून आतापर्यंत ७५ हजार गायी दगावल्या आहेत. प्रत्यक्षात याचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र देशात ५७ हजार गायी मृत्युमुखी पडल्याचे केंद्र सरकारने सांगितले.

राज्यात लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या जनावरांसाठी शेतकरी, पशुपालकांना जिल्हा परिषदेच्या निधीतून १० हजार रुपये मदत देण्याचे आदेश महसूल, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी जळगाव येथील बैठकीत दिले आहेत.

पशुधनाची आकडेवारी

राजस्थानमध्ये ३३ पैकी ३१, गुजरातमध्ये ३३ पैकी २६, पंजाबच्या सर्व म्हणजे २३, हरियाणातही सर्व २२ आणि उत्तर प्रदेशातील ७५ पैकी २१ जिल्ह्यांत लम्पीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आहे.तर महाराष्ट्रात त्यातुलनेने कमी म्हणजे १७ जिल्ह्यांमध्ये याचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे विशेषत: गो पालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुधाची टंचाई

दुसरीकडे दुधाचीही टंचाई जाणवत आहे. ज्या राज्यांमध्ये प्रादुर्भावर मोठ्या प्रमाणात आहे तिथे पाऊस कधी थांबतो याकडे राज्य सरकारांचे लक्ष लागून आहे. पावसामुळे या आजाराचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याचे मानले जात आहे. पाऊस थांबताच डास,माश्या कमी होतील आणि लम्पी आटोक्यात येऊ शकेल. दरम्यान,जनावरांचे लसीकरणही वेगात सुरु आहे. सध्या गायींना पॉक्स लस दिली जात आहे. राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र आणि भारतीय पशु चिकित्सा संशोधन संस्था स्वदेशी लस निर्मितीची तयारी करीत आहे. लम्पी लागण झाल्यास गायीचे दूध कमी होते. आमच्याकडे पुरवठा अर्धा टक्का घटला आहे. सणासुदीपर्यंत परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा आहे.

नेमका आजार काय?

हा आजार जुलै २०१९ मध्ये प्रथम बांगलादेशात आढळला. त्याचवर्षी भारतातील पूर्वेकडील राज्ये पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये व यावर्षी अंदमान-निकोबारसह पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यात प्रादुर्भाव झाला. लम्पी विषाणूमुळे चर्मरोग होतो.जनावरांमध्ये त्याची झपाट्याने लागण होते. काही डास, माशा आणि चिलटांद्वारे याचा फैलाव होतो.

महाराष्ट्रातील स्थिती

1435 बाधित जनावरे
52 जनावरे दगावली
17 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव.

About विश्व भारत

Check Also

कालाबाजारी और नकली उर्वरकों के मामले में दोषियों के खिलाफ होगी कार्रवाई

कालाबाजारी और नकली उर्वरकों के मामले में दोषियों के खिलाफ होगी कार्रवाई टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

बांग्लादेशी घुसपैठियों को देश सें निकालने का आदेश: सुप्रीम कोर्ट की महत्वपूर्ण टिप्पणी?

बांग्लादेशी घुसपैठियों को देश सें निकालने का आदेश: सुप्रीम कोर्ट की महत्वपूर्ण टिप्पणी? टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *