Breaking News

‘आयएएस’अधिकाऱ्याला कोसळले रडू… काय कारण?

विश्व भारत ऑनलाईन :
आयएएस अधिकाऱ्यांच्या स्वभाव किंवा कठोर निर्णयाने त्यांच्या हाताखालील बरेच अधिकारी, कर्मचारी दुखावले जातात.

परंतु, काही अधिकारी आपल्या स्वभावाने आणि कामाच्या पद्धतीने कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मन जिंकून जातात.आणि हे सिद्ध कधी होते तर त्यांची बदली झाली की त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी. किंवा त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला. असाच निरोप समारंभ अलीकडेच नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये घडला आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांच्या निरोपावेळी अधिकारी, कर्मचारी यांना रडू कोसळलंय.

अडीच वर्षाच्या कार्यकाळात लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी, आणि कर्मचारी यांची मने जिंकल्याचे दिसून आले.

लीना बनसोड यांना निरोप देत असतांना अधिकारी आणि कर्मचारी यांच्या डोळ्यातील अश्रु पाहून बनसोड यांनाही रडू कोसळले.

About विश्व भारत

Check Also

मंत्र्याच्या आग्रहावरून जिल्हाधिकाऱ्यांची बदली

उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवल्यापासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच …

दोन न्यायाधीश निलंबित : मुंबई हायकोर्टाचा निर्णय

सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *