विश्व भारत ऑनलाईन :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बंदद्वाराआड 20 मिनिट भंडाऱ्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.
दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशात पटोले आणि फडणवीस यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोमवारी फडणवीस भंडारा दौऱ्यावर होते. त्यात बैठकही झाली. मात्र, अन्य आमदार बाहेर पडल्यावर फडणवीस आणि पटोले यांच्यात चर्चा झाली. ही राजकीय चर्चा असल्याची माहिती मिळत आहे.
तर, यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पटोले सागर बंगल्यावर गेले होते. विधान परिषद निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी पटोले फडणवीसांची भेट घेतली होती.