विश्व भारत ऑनलाईन :
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारापुर्वी 8 राज्याचे राज्यपाल बदलले होते. महाराष्ट्रात अनेक वेळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलावावे, अशी मागणी केली जात होती. मात्र, तसे काही झालेले नाही. देशातील 8 राज्यातील राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल बदलण्यात येणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित आधीही उपस्थित झाला होता.
आता सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्रच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्याचे अनेक व्हाट्सअपवर, सोशल मीडियात दिसत आहे. मात्र, अजून तरी कोणतीही अधिसूचना काढण्यात आली नसल्याचे कळते.