Breaking News

65 अधिकाऱ्यांचा रेल्वेत विनातिकीट प्रवास : ‘वंदे भारत’मध्ये बिलासपूर ते नागपूर दरम्यानची कारवाई

Advertisements

बिलासपूर ते नागपूरदरम्यान डिसेंबरमध्ये वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरु झाली. या एक्सप्रेसमध्ये गेल्या काही दिवसांत रेल्वेचेच ६५ अधिकारी विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत. काही अधिकारी कुटुंबीयांसोबत प्रवास करतानाही दिसले. रेल्वेच्या नियमानुसार अशा अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते.

Advertisements

झोन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कदाचित नियम माहीत नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी प्रवास केला असावा. म्हणून त्यांना दंड केला जाईल. झोनच्या पीसीसीएमनी ज्या विभागात हे अधिकारी काम करतात त्या विभागांना पत्र पाठवून चौकशी व कारवाई करण्यास सांगितले आहे. असे सर्व अधिकारी वरिष्ठ प्रशासकीय ग्रेडच्या खालच्या रँकचे आहेत. बिलासपूर ते नागपूर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.

Advertisements

येथे थांबते ही एक्सप्रेस

ही रेल्वे बिलासपूर ते नागपूर हे अंतर साडेपाच तासांत पार करते. बिलासपूरनंतर रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया येथे थांबते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘पीडब्लूडी’मधील कार्यकारी अभियंता साखरवाडेना निलंबित करा : प्रेतयात्रा काढून आंदोलन

सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ मधील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे आणि अनियमित कारभाराच्या आरोपांवरून …

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *