Breaking News

कधी बरसणार पाऊस?राज्यात पुन्हा पावसाचे सावट

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा ओघ कमी झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागातून थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल सुद्धा लागली आहे. त्याचवेळी आता विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

 

उत्तर भारतात यावर्षी कडाक्याची थंडी होती. परिणामी उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवला. आता उत्तरेकडील थंडी कमी झाल्यामुळे राज्यातील अनेक भागातून थंडीने सुद्धा काढता पाय घेतला आहे. थंड वाऱ्यामुळे रात्री आणि पहाटेच्या सुमारास हलका गारवा जाणवत आहे. तरीही किमान तापमानसह कमाल तापमानातसुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे आता दिवस उन्हाचे हलके चटके जाणवू लागले आहेत.

आजपासून महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ ते तेलंगणा, कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण आहे. तर आजपासून अरुणाचल प्रदेशसह पश्चिम बंगाल, नागालँड, मेघालय, आसाम,त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे.

About विश्व भारत

Check Also

ताडोबातील वाघांच्या अभयारण्यावर हत्तीचे अतिक्रमण

ओरिसातून स्थलांतरित होणाऱ्या रानटी हत्तींनी महाराष्ट्रातील वन खात्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. याआधी साधारणत: चार …

आजपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात येत्या तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *