आधी इंडिया अलायन्सला भाजपकडून एकामागे एक मोठे झटके लागत आहे. आधी ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर आम आदमी पक्षाने देखील आपण स्वबळावर पंजाबमध्ये निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. मग बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे भाजप आपल्या जुन्या मित्रांना परत एनडीए आघाडीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी भाजपने एक कमिटी देखील स्थापन केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना एनडीएमध्ये सहभागी करुन घेतल्यानंतर आता भाजप मनसेला देखील एनडीएमध्ये आणण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे.
![](https://vishwbharat.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240117-WA0007-660x330.jpg)