Advertisements
आमदार धोटेंच्या उपस्थितीत अल्ट्राटेकला निवेदन.
(नांदा-बिबीच्या मध्य भागातील नाला खोलीकरण व साफसफाईची मागणी.)
कोरपना(ता.प्र.)
कोरपना तालुक्यातील नांदा गाव येथील शांती कॉलनी व बिबी येथील रामनगर कॉलनी यादोन्ही गावांच्या वस्तीमधील नाल्यात घाण साचून असल्याने पाणीचा प्रवाह अक्षरशः बंद झाला आहे.पोकलेनद्वारे या नाल्यांचे खोलीकरण व साफसफाई करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत अल्ट्राटेक कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आला आहे.या दोन्ही वस्तीच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नाल्यामध्ये मोठ्याप्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. सततच्या दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव व इतर आरोग्य संबंधी समस्या निर्माण झाल्या असून या नाल्याची साफसफाई व खोलीकरण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.नाल्यात घाणीचा विळखा पसरला असून लवकरात लवकर नाला सफाई करण्याची मागणी आमदार धोटे यांच्या उपस्थितीत बिबी ग्रामपंचायतचे उपसरपंच आशिष देरकर,नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत,बिबी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र अल्ली,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे,हारूण सिद्दिकी,पत्रकार गणेश लोंढे आदींनी अल्ट्राटेकचे महाव्यवस्थापक विजय एकरे व उपमहाव्यवस्थापक कर्नल दीपक डे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच नाला सफाई करून देण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
Advertisements