Breaking News

नागपुरात सकाळपासून पावसाला सुरुवात : अकोला-अमरावतीत वीज पडून 2 जण ठार

Advertisements

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पारनेर तांडा शिवारात वीज पडल्यामुळे लिंबाच्या झाडाने पेट घेतल्याने ते जळून खाक झाले.
चाैदा दिवसांच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगरला गुरुवारी पावसाने धुऊन काढले. सायंकाळच्या सुमारास सुरू झाल्यानंतर अवघ्या चार तासांत ९७ मिमी धो-धो पाऊस पडला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या संभाजीनगरकरांना या पावसाने दिलासा मिळाला.

Advertisements

जालना जिल्ह्यातही गुरुवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. यामुळे सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांना दिलासा मिळाला, तर अंबड तालुक्यातील पारनेर तांडा शिवारात रात्री ८ वाजेदरम्यान वीज पडून लिंबाचे झाड जळून खाक झाले. विदर्भात अकोला, अमरावती जिल्ह्यात वीज पडून दोन जण ठार झाले. सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागातही दमदार पाऊस झाला.

Advertisements

राज्यात मंगळवारपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक | मान्सूनचा आस गुरुवारी (दि.२१) सरासरी जागेपासून दक्षिणेला सरकला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातील साडेसात किलोमीटर उंचीचे कमी दाबाचे क्षेत्र झारखंड राज्यासह सभोवताली तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात २६ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

तर नागपुरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारपर्यंत असाच मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *