Breaking News

वर्धा येथे स्व,सिंधुताई सपकाळ यांचे स्मारक बनविण्यात यावे:अंबिका हिंगमीरे,वीरांगना बिग्रेड संस्थापक अध्यक्ष

Advertisements

वर्धा येथे स्व,सिंधुताई सपकाळ यांचे स्मारक बनविण्यात यावे:अंबिका हिंगमीरे वीरांगना बिग्रेड संस्थापक अध्यक्ष यांची मागणी

Advertisements

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- अनाथांची माय अशी उपाधी असलेल्या पद्मश्री स्व . सिंधुताई सपकाळ यांचे वर्धा जिल्हयाशी अनोखे नाते आहे . त्यांचे माहेर आणि सासर हे दोन्ही वर्धा जिल्हयात असुन त्यांच्या कार्यकर्तृत्वाची झालर ही वर्धा जिल्हयात सुध्दा लाभली आहे . या जिल्हयातुन त्यांनी अनाथांची माय बनुन सातासमुद्रापार स्वतःची आणि जिल्हयाची ओळख निर्माण करून दिली . वर्धा जिल्हयात त्यांनी कायम वास्तव्य केले आहे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी , त्यांचे कार्य देशभर पोहोचविण्यासाठी वर्धा शहरात त्यांचे स्मारक होणे ही वर्धा जिल्हयासाठी आणि राज्यासाठी अभिमानस्पद बाब असेल . भावी पिढीला त्यांच्या कार्याची माहिती होण्याच्या उद्देशाने त्यांचे स्मारक हे एक ऊर्जा केंद्र म्हणुन समोर येईल ,स्व . सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथ मुलांना पोटाशी कवाळुन त्यांना सन्मानाने जगविले , मोठे केले आणि स्वतःच्या पायावर उभे केले . अत्यंत बिकट परिस्थितीतुन आलेल्या माईंनी अनेक संकटाशी सामना करुन देशातल्या कर्तृत्ववान महिलांमध्ये स्थान मिळविले आहे . त्यामुळे वर्धा शहरात स्व .सिंधुताई सपकाळ यांचे स्मारक वर्धेत लवकरात लवकर व्हावे अशी मागणी वीरांगना बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा अंबिका हिंगमीरे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे,यावेळी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

सद्गुरु जग्गू वासुदेव यांच्या इशा फाऊंडेशनमधून ६ लोक बेपत्ता

आध्यात्मिक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा तमिळनाडूमधील कोइम्बतूर याठिकाणी इशा फाऊंडेशन नावाची संस्था आहे. या ठिकाणाहून …

सड़क व भवन निर्माता कंपनियों ने बिना परमिशन के हीं खुदाई करवा दी नागपूर के सुरादेवी की पहाडी? सरकार को करोडों की चपत

सड़क व भवन निर्माता कंपनियों ने बिना परमिशन के हीं खुदाई करवा दी नागपूर के …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *