Breaking News

जायकवाडी धरणाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Advertisements

 

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गुरुवारी २.५ फूट उंचावून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. शुक्रवारी सायंकाळी आवक वाढल्याने यंदा पहिल्यांदाच २७ पैकी पाच आपत्कालीन दरवाजांसह २५ दरवाजे ४ फुटांनी उंचावून ७९ हजार १२४ क्युसेक विसर्ग गाेदावरीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisements

जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ९८.३५ टक्क्यांवर आहे. शुक्रवारी सकाळी धरणाचे १० ते २७ असे १८ दरवाजे ३ फूट उंचीवरून ३.५ फूट उंचीवर स्थिर करण्यात आले होते. सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान पाच आपत्कालीनसह २५ दरवाजे ४ फूट उंचावून नदीपात्रात ७९१२४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी दुपारी जायकवाडीचे १८ दरवाजे ४ फूट उंचावरून उघडण्यात आले होते. मात्र आवक वाढल्याने सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान ५ आपत्कालीनसह २५ दरवाजे उघडण्यात आले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूरसह राज्यात शुक्रवारपासून येणार पाऊस!

हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण राज्यात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार, पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात …

भूगर्भ ‘ब्लास्टिंग’ विस्फोट और पेयजल के अभाव में वन्यप्राणियों के विनाश का खतरा

भूगर्भ ‘ब्लास्टिंग’ विस्फोट और पेयजल के अभाव में वन्यप्राणियों के विनाश का खतरा   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *