Breaking News

जायकवाडी धरणाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गुरुवारी २.५ फूट उंचावून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. शुक्रवारी सायंकाळी आवक वाढल्याने यंदा पहिल्यांदाच २७ पैकी पाच आपत्कालीन दरवाजांसह २५ दरवाजे ४ फुटांनी उंचावून ७९ हजार १२४ क्युसेक विसर्ग गाेदावरीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ९८.३५ टक्क्यांवर आहे. शुक्रवारी सकाळी धरणाचे १० ते २७ असे १८ दरवाजे ३ फूट उंचीवरून ३.५ फूट उंचीवर स्थिर करण्यात आले होते. सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान पाच आपत्कालीनसह २५ दरवाजे ४ फूट उंचावून नदीपात्रात ७९१२४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी दुपारी जायकवाडीचे १८ दरवाजे ४ फूट उंचावरून उघडण्यात आले होते. मात्र आवक वाढल्याने सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान ५ आपत्कालीनसह २५ दरवाजे उघडण्यात आले.

About विश्व भारत

Check Also

उपचारादरम्यान वाघाला आला “हार्टअटॅक”!

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, देवलापार वनपरिक्षेत्रातून उपचारासाठी आणलेल्या वाघिणीच्या बछड्याचा उपचारादरम्यान ‘हार्टअटॅक’ने मृत्यू झाला. मरणासन्न अवस्थेतील …

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *