Breaking News

सरपंच, उपसरपंच मानधनाविना

मुंबई : सरपंच, उपसरपंचांना मानधनासाठी करावी लागणारी भटकंती कायम आहे. त्यामुळे राज्यातील सरपंच, उपसरपंचांसाठी मानधन हे मृगजळ ठरले आहे. राज्यातील २५ हजारांपेक्षा अधिक गावातील सरपंच, उपसरपंचांमध्ये नाराजी आहे.

सरपंच-उपसरपंचांचे मानधन देण्याची जबाबदारी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान संस्थेकडे सोपवली होती. यात ग्रामपंचायत संगणक परिचालकांना (डेटा ऑपरेटर) मानधनविषयक माहिती संकलनाची जबाबदारी देण्यात आली. हे संकलन दरमहा करायची अट घालण्यात आली. त्यासंदर्भातील माहिती कधी पंचायत समिती, कधी जिल्हा परिषद, त्यानंतर कधी अभियान तर कधी बँकेत पाठवण्यात येते. समन्वय नसल्याने चार महिन्यांपासून राज्यभरातील २५ हजार सरपंच, उपसरपंच मानधनापासून वंचित असल्याचे कळते.

About विश्व भारत

Check Also

MP में मेट्रो की नींव हमारे कार्यकाल में रखी : कमलनाथ का बयान 

MP में मेट्रो की नींव हमारे कार्यकाल में रखी : कमलनाथ का बयान टेकचंद्र सनोडिया …

कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांची कोर्टात धाव

कर्जमाफीसाठी पात्र असूनही लाभ न मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *