विश्व भारत ऑनलाईन :
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होण्याची शक्यता आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज त्यांचा पंजाब लोक कॉंग्रेस पक्ष भाजप मध्ये विलीन केला.
भाजपमध्ये पक्ष विलीन करताना त्यांनी त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रीपदाची मागणी केली होती. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा भाजप प्रवेश लांबला होता. भाजपने त्यांच्या या मागण्या नाकारत त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची ऑफर दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर घटनात्मक पदाची जबाबदारी देणार असल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शहा त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी अनुपस्थित असल्याचं कळतं आहे.