Breaking News

‘शिवभोजन थाळी’त गैरव्यवहार : शिंदे-फडणवीस सरकारला संशय

 

विश्व भारत ऑनलाईन :
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शिवभोजन थाळी ही योजना बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे.

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जनतेला १० रूपयांमध्ये जेवण मिळत होते. कोरोना काळात किंमत 5 रूपये करण्यात आली होती. या योजनेमुळे गरीबांना मोठा आधार मिळत होता.

ही योजना काय आहे?

राज्यातील गरीबांना, गरजूंनाा सहज आणि अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे. राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे ५० रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना ३५ रुपये अनुदान देण्यात येत होते. आता शिंदे फडणवीस सरकारला या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संश आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे.

About विश्व भारत

Check Also

भाजपकडून तेली समाजाचा अपेक्षाभंग : तिघांनाच तिकीट

तेली समाज हा माझाच आहे. तो सदाही माझा पाठीराखा म्हणून मी पण तेली समाजाचा पाठीराखा. …

प्रगतिशील और समृद्धशाली हैं कुर्मी क्षत्रीय समाज : CM विष्णुदेव साय का बयान

प्रगतिशील और समृद्धशाली हैं कुर्मी क्षत्रीय समाज : CM श्री विष्णुदेव साय का बयान टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *