Breaking News

शाळेत नापास, पण आता IAS, IPS अधिकारी, वाचा यशोगाथा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

देशातील सर्वात ‘टफ’ परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाची(यूपीएससी) असते. विद्यार्थी दिवसरात्र एक करून मेहनत घेतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार आयएएस, आयपीएस होतात. पण, आयपीएस,आयएएस अधिकारी होणे वाटते तितके सोपी नाही. पण आज आम्ही अशाच काही आयएएस अधिकाऱ्यांची यशोगाथा सांगणार आहोत. हे आयएएस,आयपीएस अधिकारी शाळेत नापास झाले होते. पण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी उत्तीर्ण झालेत.

Advertisements

रुक्मणी रियार

आयएएस रुक्मणी रियार राजस्थानमध्ये जिल्हाधिकारी आहेत. त्या मुळच्या पंजाबमधील चंदीगडची आहे. रिपोर्ट्सनुसार, त्या सहावीच्या वर्गात नापास झाली होत्या. पण असं असतानाही यूपीएससी परीक्षेत एआयआर 2 मिळवून इतके मोठे स्थान मिळवले आहे. रुक्मणी रियार यांचे वडील देखील आयएएस अधिकारी आहेत.

मनोज शर्मा

महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी मनोज शर्मा हे 12वी मध्ये नापास झाले होते. इयत्ता 12वीत अनुत्तीर्ण होण्याव्यतिरिक्त, एव्हरेज विद्यार्थी होते आणि खूप कमी गुणांसह पास व्हायचे. त्यांची यशोगाथा वाचून सर्वांना खरोखरच प्रेरणा मिळते.

अंजू शर्मा

आयएएस अंजू शर्माने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ती दहावीच्या प्री बोर्ड परीक्षेत नापास झाली होती. इतकंच नाही तर 12वीला पुन्हा एकदा सामोरे जावे लागले. मात्र, नंतर परीक्षा उत्तीर्ण झाल्या. आयएएस अंजू शर्माने या घटनेतून शिकत कठोर परिश्रम केले आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या काळात त्याच्या आईने त्याला साथ दिली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘पीडब्लूडी’चे संजय उपाध्ये, प्रशांत वसुले यांचा पुरस्काराने गौरव : मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला. …

‘पीडब्लूडी’चे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांना वैयक्तिक पुरस्कार घोषित

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला.याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *