Breaking News

भाजीपाला महागणार : 42 लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

विश्व भारत ऑनलाईन :
परतीच्या पावसाने सर्वत्र दाणादान उडवली. याचा फटका सुमारे ४२ लाख शेतकऱ्यांना बसला आहे. आतापर्यंत ३० लाख शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर,उर्वरित ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले.

भाजीपाला महागणार

मुसळधार पावसामुळे भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. भाज्यांची आवक पूर्ववत होताच दर कमी होतील.

काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे भाज्यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक,ठाण्यात भाज्यांची आवक घटली असून, दरांत आणखी वाढ झाली आहे.

About विश्व भारत

Check Also

पावसाची प्रतिक्षा : नागपुरसह अनेक जिल्हे कोरडे

मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पण पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षाच आहे. रविवारी पश्चिम विदर्भात …

शेतकऱ्यांची लूट : पीक बियाणाची दुप्पट दराने विक्री, अधिकारी गायब

विविध जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणासाठी शेतकरी आक्रमक झाल्यानंतर बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *