विश्व भारत ऑनलाईन :
परतीच्या पावसाने सर्वत्र दाणादान उडवली. याचा फटका सुमारे ४२ लाख शेतकऱ्यांना बसला आहे. आतापर्यंत ३० लाख शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर,उर्वरित ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले.
भाजीपाला महागणार
मुसळधार पावसामुळे भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. भाज्यांची आवक पूर्ववत होताच दर कमी होतील.
काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे भाज्यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक,ठाण्यात भाज्यांची आवक घटली असून, दरांत आणखी वाढ झाली आहे.