Breaking News

सामना जिंकला, तरीही विराट, हार्दिक रडले ; पाहा व्हिडिओ

विश्व भारत ऑनलाईन :

मेलबर्न येथे झालेल्या टी२० सामन्यांत भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सने विजय मिळविला. या विजयासह भारताने विश्वचषकामध्ये विजयी सलामी दिली. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या भारतीय संघाच्या विजयाचे हिरो ठरले. हार्दिकने ४० तर, विराटने नाबाद ८२ धावा केल्या. भारताने हा सामना जिंकल्यानंतर मैदानावरच दोन्ही खेळाडू भावूक झाले.

भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारत २०२१ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. यावेळी आनंद साजरा करत असताना हार्दिक पांड्यालाही अश्रूंचा बांध फुटला. विजयानंतर हार्दिकने विराटला मिठी मारली. संपूर्ण टीमने या दिग्गज खेळाडूचे स्वागत केले. तसेच शुभेच्छा दिल्या. कॅप्टन रोहित शर्माने तर विराटला खांद्यावर उचलून घेतले.

व्हिडीओ पहा 👇👇👇👇https://twitter.com/BhinderChris_H/status/1584158603099123712?t=FA_vk757XkjRANifN1Yhfw&s=19

 

About विश्व भारत

Check Also

सांसद बृजभूषण शरण सिंह को कौन बचा रहा है? कानून या राजनीति : मामला बडा ही पेचीदा है

नई दिल्ली । सांसद और कुश्ती महासंघ के अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह के खिलाफ दिल्ली …

IPL मध्ये ग्लॅमरस चीअर लीडर्सची निवड कशी होते?कोणत्या सुविधा मिळतात? वाचा…!

इंडियन प्रीमियर लीग सुरू होऊन दोन आठवडे झाले. प्रतिभेला संधी मिळवून देणारी स्पर्धा असे आयपीएलचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *