विश्व भारत ऑनलाईन :
राज्याचा प्रशासकीय कारभार मुंबई मंत्रालयातून हाकला जातो. मात्र, याच मंत्रालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागात अवर सचिव स्तरावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी उपसंचालक पदावर असलेल्या महिलेचा विनयभंग केला. ‘मला बरे वाटत नाही, मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव’, अशा प्रकारचे हीन वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवांनी केले आहे.
त्याच ठिकाणी याच विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.