Breaking News

महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात पीक पंचनामे करण्यासाठी 400 रुपयांची मागणी : शिंदे गटाची तक्रार

विश्व भारत ऑनलाईन :
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी ४०० रुपयांची मागणी होत आहे, अशी तक्रार शिवसेनेने (शिंदे गट) तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

कृषी विभागामार्फत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याकरिता शासनाचे अधिकृत अधिकारी शेतात न जाता गावातील खासगी लोकांना(एजंट) शेतकऱ्यांकडे पंचनाम्यासाठी पाठवीत आहेत. हे खासगी लोक शेतकऱ्यांकडे पंचनामा करण्यासाठी एकरी २०० ते ४०० रुपयांची मागणी करित आहेत. त्याशिवाय पंचनामे करित नाहीत. त्या संबंधित पैसे मागणाऱ्या व्यक्तींचा शेतकऱ्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला, तर अरेरावाची भाषा करतात. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी. तसेच शेतकऱ्यांकडून अनाधिकृतपणे पैसे जमा करणाऱ्या व्यक्ती, कर्मचारी, अधिकारी यांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करून निलंबन करावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

About विश्व भारत

Check Also

पावसाची प्रतिक्षा : नागपुरसह अनेक जिल्हे कोरडे

मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पण पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षाच आहे. रविवारी पश्चिम विदर्भात …

शेतकऱ्यांची लूट : पीक बियाणाची दुप्पट दराने विक्री, अधिकारी गायब

विविध जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणासाठी शेतकरी आक्रमक झाल्यानंतर बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *