Breaking News

विदर्भाला हुडहुडी ; राज्यातही पाच दिवस कडाक्याची थंडी

राज्यभरात थंडीची हुडहुडी सुरू झालीय. येत्या काही दिवसात विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पारा घसरून थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि कोकण किनारपट्टीलाही कडाक्याच्या थंडीचा इशारा मिळालाय.

विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत वातावरण कोरडे असून, पुढील काही दिवस या ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. काल विदर्भातील अमरावती (10.8°C), यवतमाळ (11.05°C) आणि नागपूर(11.06 °C) या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. हीच परिस्थिती पुढील पाच दिवस राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

शहरे व तापमान

नाशिक (10.4°C), पूणे (11.03), औरंगाबाद (11.1°C), कोल्हापूर (16.04°C), नांदेड(14°C), जळगाव (13°C), अहमदनगर (13.08°C) या ठिकाणीही कमी तापमानाची नोंद झाली असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

About विश्व भारत

Check Also

आजपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात येत्या तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची …

छुई-कान्हीवाड़ा परिसर में रेस्क्यू कर बाघ को पकड़ा

छुई-कान्हीवाड़ा परिसर में रेस्क्यू कर बाघ को पकड़ा   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *