औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी (आय.ए.एस) कुलदीप जंगम यांची राज्य सरकारने बदली केली आहे.
जंगम यांची नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागात सहायक जिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. जंगम यांनी मागील सहा महिन्यात विविध लोकोपयोगी कामे केली. उल्लेखनीय म्हणजे सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक होता. लोकांना न्याय देण्याचे काम जंगम यांनी केले, अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त झाली आहे. तर, प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जंगम यांच्या बदलीने धक्का बसला आहे.
विश्वभारत News Website