Breaking News

मारुती उपासना : सुंदरकांड आणि युद्धकांडातून रामायणाची उभारणी

Advertisements

समर्थांनी ‘सुंदरकांड’ व ‘युद्धकांड’ या दोन कांडांवरच आपल्या रामायणाची उभारणी केली आहे. याचे बीज समर्थांच्या हनुमानभक्तीत आहे. या दोन कांडांमध्ये मारुतीचा पराक्रम व राम-रावण युद्ध यांचेच वर्णन आहे. महाराष्ट्रातील तरुणांपुढे शक्ती, युक्ती व भक्ती या गुणत्रयाचा पुतळा उभा करावा आणि मुख्यत: शक्तिसंपादनाकडे, म्हणजेच बलोपासनेकडे त्यांची प्रवृत्ती व्हावी, हाच समर्थांचा हेतू असावा.

Advertisements

मारुतीचे सगळे बळ त्याच्या शेपटीत होते. लंकेमध्ये त्याच्या ‘लांगुलाने’ म्हणजे शेपटीने काय कहर केला, त्याचे सुंदर वर्णन समर्थांनी सुंदरकांडात केले आहे. मारुतीने स्वत: गुप्त राहून, आपल्या लांगुलाकडून असे काही थरारनाट्य केले, की त्यामुळे सुंदरकांडासारखे सुंदर, रमणीय कांड उभे राहिले, असे समर्थ सांगतात. ते म्हणतात, ‘नटनाटकू त्रिकुटामाजि कैसा। महाकांड सुंदर्य जाला तमासा।’

Advertisements

मारुतीचे शेपूट शक्तिरूप आहे. याविषयी एक कथा आहे. हनुमान हे साक्षात शंकराचे अवतार. पार्वतीही अवतार घेऊ इच्छित होती; पण शंकर म्हणाले, ‘मला या अवतारात ब्रह्मचारीच राहायचे आहे.’ पार्वती म्हणाली, ‘मी आपल्याशिवाय जगू शकणार नाही.’ तेव्हा शंकरांनी हनुमानाचे रूप घेतले व पार्वती झाली त्याची शेपटी. म्हणजे शिवाबरोबर शक्तीही आलीच. त्यामुळेच समर्थांनी या शेपटीच्या पराक्रमाचे ठिकठिकाणी वर्णन केलेले दिसते. ज्याप्रमाणे, महादेव मारुतीच्या रूपात अवतीर्ण झाले, त्याप्रमाणे मारुतीदेखील अनेक जिवांच्या रूपांत अंशरूपाने किंवा आवेशरूपाने अवतीर्ण झाले, असे म्हटले जाते. समर्थ रामदास हे मारुतीचा अवतारच मानले जातात. चारही युगांतील मारुतीच्या अवताराबद्दल गिरीधरस्वामी म्हणतात, ‘कृतयुगी अंतरात्मा पवन। त्रेतायुगी पवननंदन। द्वापारी म्हणती भीमसेन। श्रीरामदासस्वामी कलियुगी।।’

विचाराने मारुती उपासना ही समर्थ उपासना ठरते. समर्थांनी सांगितलेली मारुतीची उपासना नेमस्तपणे, म्हणजेच नेमकेपणाने करायची. त्यासाठी दर शनिवारी मारुतीला तेल व वड्याची माळ अर्पण करून भागणार नाही, तर मारुतीजवळ असणारी शक्ती, भक्ती, युक्ती व बुद्धी अशी जी वेगवेगळी सामर्थ्ये आहेत, ती प्राप्त होवोत म्हणून प्रार्थना करायची. मारुती उपासना दृढ करण्यासाठी समर्थांनी त्यांच्या ग्रंथांतून सांगितलेले विचारधन हे श्रवण-मननाद्वारे चित्तात ठसवायचे आणि आचरणात आणायचे, हीच खरी त्याची उपासना. ‘पशुपती श्रीपती आणि गभस्ती। यांच्या दर्शने दोष जाती। तैसाचि नमावा मारुती। नित्य नेमे विशेष।।’ दासबोध.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सत्ता के भूखे चरित्रहीन राजा से नैसर्गिक न्याय की अपेक्षा रखना उचित नहीं?

सत्ता के भूखे चरित्रहीन राजा से नैसर्गिक न्याय की अपेक्षा रखना उचित नहीं? टेकचंद्र सनोडिया …

चारित्र्यहीन राजाकडून नैसर्गिक न्यायाची अपेक्षा योग्य नाही का?

चारित्र्यहीन राजाकडून नैसर्गिक न्यायाची अपेक्षा योग्य नाही का? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: ९८२२५५०२२०   राज्याच्या कारभारात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *