Breaking News

पनवती कोण? काँग्रेसला आता कळले असेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जे अभूतपूर्व यश मिळाले ते यश जनतेच्या मोदींवरच्या विश्वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली. पनवती कोण हे काँग्रेसला कळले असेल, असा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.

मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवले की सरकार त्यांच्यासाठी काम करते आहे. त्याचा प्रत्यय लोकांना आल्याने भाजपचा हा अभूतपूर्व विजय साकार झाला, असे फडणवीस म्हणाले. या विजयाचे श्रेय खर्‍या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच आहे. शिवाय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह जी भाजपची टीम आहे त्या सगळ्यांचे देखील हे श्रेय आहे. या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

About विश्व भारत

Check Also

सरकार को दिल्ली मे फिर से किसान आंदोलन पुनरावृति की सुगबुगाहट

सरकार को दिल्ली मे फिर से किसान आंदोलन पुनरावृति की सुगबुगाहट टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला : नागपुरात पावसाचा जोर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *