Breaking News

वर्धा :- आज जिल्हाधिकारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दुपारी 2 वाजता जनतेशी साधणार संवाद / जनतेच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे

वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- वर्धा जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येत  वाढ होत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, कोविड रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार ‘फेसबुक लाईव्ह’ च्या  माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्या 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता नागरिक त्यांच्या मनातील प्रश्न थेट विचारू शकतात.

     वर्धा जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या कमी होती. मात्र 15 ऑगस्टला एकाच दिवशी  40 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली, आणि तेव्हापासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आता सर्वच बाबी पुन्हा सुरू झाल्यामुळे सर्वत्र गर्दीचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतः सोबत कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. ही वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. त्याची माहिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी देणार आहेत. याशिवाय, जनतेच्या मनात कोरोना संदर्भात अनेक प्रश्न, समज, गैरसमज निर्माण होत आहेत. नागरिकांच्या सर्व प्रश्नांना सुद्धा जिल्हाधिकारी या माध्यमातून उत्तरे देतील. नागरिकांनी उद्या दुपारी 2 वाजता  District CollectorateWardhaच्‍याhttps://www.facebook.com/profile.php?id=100013004943880या फेसबुक लिंकवर जाऊन जिल्हाधिकारी यांना ऐकावे आणि त्यांच्याशी थेट संवाद साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी कार्यालयातर्फे करण्‍यात आले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरजवळील उड्डाण पुलावरून कार खाली कोसळली : दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील बूटीबोरी येथे उड्डाणपुलावरून महिंद्रा ७०० कार कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला …

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *